शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणार्यां बँकांवर कारवाईसाठी आ.भारत भालके झाले आक्रमक... - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, February 27, 2020

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणार्यां बँकांवर कारवाईसाठी आ.भारत भालके झाले आक्रमक...


मंगळवेढा / प्रतिनिधी
               जिल्ह्यात पावणेतीन लाख शेतकर्याकडून कर्जाची मागणी असताना केवळ 27 हजार शेतकर्याना दिले आहे त्यामुळे शेतकर्याना  बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने  सरकारने संबधित बँकांवर कारवाई करण्याची मागणी आ.भारत भालके यांनी आज दि 27 रोजी विधानसभेत केली सरकारकडून मार्च अखेर कर्जपुरवठा करणार असल्याचे सांगितले जाते आहे 
                मात्र जिल्ह्यात मार्चच्या आधी पिकांची काढणी होते काढणीनंतर  शेतकऱ्यांना  कर्जाचा उपयोग काय होणार  पीक कापणीनंतर कर्जवाटपाची नवी पद्धत सरकार  सुरू करणार  काय ? तसेच सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा असून शेतकऱ्यांचे  गारपीट,जळीत,अवकाळी पाऊस,महापूर, यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले परंतु  त्यांना काहीच मदत झाली नाही  त्यामुळे त्यांना बँकांनी व सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे  
         
पावणेतीन लाख शेतकर्याची कर्जाची मागणी असताना केवळ 27 हजार शेतकऱ्यांना कर्ज मिळाले असून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने त्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी आ. भालके यांनी केली त्यावर उत्तर देताना सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील म्हणाले की ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल तसेच रब्बी हंगामातील कर्जवाटपाची मर्यादा मार्च अखेर पर्यंत वाढवली गेली आहे  
               धरणात पाणी असल्याने ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल असे त्यांनी सांगितले गेल्या दोन  दिवसापासून आ.भारत भालके हे आजारी असून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते परंतु आज विधानसभेत मतदारसंघातील प्रश्न व कामे असल्याने डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले असतानाही सकाळी डिस्चार्ज घेऊन ते विधानसभेत दाखल होत जिल्ह्यातील शेतकर्याच्या कर्जाच्या प्रश्नावर आवाज उठविला 

पांडुरंग बोला....
               "विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आ भारत भालके यांनी जिल्ह्यातील शेतकर्याच्या प्रश्नावर  बोलण्यासाठी  विना अडथळा वेळ देण्याची मागणी केली त्यावर  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आ.  भारत भालके यांना पांडुरंग बोला... असे म्हणत बोलण्यास सांगितले.

Pages