महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा.. - Divyaprabhat News

Breaking News

Monday, March 23, 2020

महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा..

करोनाचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय..

मुंबई/प्रतिनिधी 
           महाराष्ट्र करोनच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. 
       
 करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Pages